भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले

- सुरेश भट

Thursday, December 30, 2010

A New Year Resolution...

0 comments
    
      Okay, Everybody is enjoying the longest weekend of the year. Now the Christmas is over & we are heading towards an another new year i.e. 2011!
     Every single new year brings a lot of things in our life. We make some resolutions & start implementing those by the 1st day of the year. For a certain period, we'll be loyal to what we have decided to do; but after that, something goes wrong in mind & we always keep that resolution for the next year to follow.
     According to me, resolution is not the thing which we should cease in between; after thinking of implementing it. Otherwise its always better to not to think of implementing it! Because anything we stop in between, our brain starts interpreting it as a negative sign so that whenever we think of the same thing again, we'll not be sure whether it'll get completed by us or not! By the result of this, we always make fun of these kinda resolutions which had been made in the past & couldn't get implemented. And finally, a resolution remains a 'resolution', we can say!
     We have to decide something means we must be lacking of it , of course! So, why to make fun of it rather than implementing it for our own sake? Remember, following the orders of the brain is simple, but controlling the instructions of it is much difficult.
     I just wanted to say, think twice before deciding anything. Wish you a very HAPPY NEW YEAR to all of my friends, colleagues, blog-readers, critics & all those people who have brought happiness in my life. Thanks a lot for being there!!
     See you in the NEW YEAR!

Wednesday, December 29, 2010

'तो' भिकारी

0 comments
पुन्हा पहिला तो भिकारी परवा
दिमाखात निघालो होतो मी...अन् कमी झाला माझा चालण्याचा वेग
पुन्हा पुन्हा मी त्याला तिथे पहातो,
जशी सवयच लागली आहे...
मला तिकडे पाहण्याची, अन् त्याला तिथे उभं राहण्याची!
प्रत्येकवेळी तो आशाळभूत पणाने माझ्याकडे पाहतो
अन् मी तसाच निघून जातो
त्याला माहीत आहे, मी रोज असाच निघून जाईन
पण तरीही तो माझ्याकडे पाहतो आजसुद्धा!
कधी काही बोलणे नाही, कधी हातवारे नाही
कदाचित तोसुद्धा थकला असेल...भीक मागून!!
ना खोकल्याचा त्रास वाटतो, ना तापाचे भय
ना उन्हाची तमा, ना पावसाची फिकीर
फक्त पोटातल्या आगीची तणतण...जीवघेणी!
त्याच्याकडे मी पाहतो अन् आठवतो 'तो' दिवस
ज्यावेळी मी पाण्याने भूक शमवली
पोट पाण्याने भरता आलं असतं तर किती बरं झालं असतं?
असा विचार मी फक्त एकदा केला होता,
पण त्याने आजवर कित्येकदा केला असेल?
सगळं आठवतं अन् मी पुढे सरसावतो..आपोआपच
त्याला पैसे देण्यासाठी..त्याचा चेहरा खुलतो
पैसे घेण्यासाठी तो हात पुढे करतो अन् त्याचे डोळे पाणावतात
म्हणतो दिवसभरात कोणी काही दिलं नाही...
मी गहिवरुन जातो...त्याच्या नशिबाला पाहून!
इथे एका वेळेची भ्रांत आहे लोकाना..
आणि आम्ही तीन-तीनदा खाउनसुद्धा भुकेलेले असतो!
वाटतं आणाव्यात सगळ्या काळ्या पैशाच्या तिजोर्‍या उचलून
आणि खायला घालावं अशा गरजूना
कारण..पाण्याने तहान भागते...भूक नाही!!

Wednesday, December 15, 2010

पुन्हा पेट्रोल दरवाढ!

0 comments
        आत्ताच बातमी वाचली, पेट्रोल आणखी २ रूपयानी वाढलं! लगेच ऑफीसात बोंबाबोम्ब चालू झाली. तीन-चार वर्षात सगळयाच वस्तुच्या किमती गगनाला जाउन भीडल्यात. आत्ता बाकीच्या गोष्टीचे भाव सुद्धा लगेच वाढ़ू लागतील. म्हणजे आणखी महागाई!! आधीच महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला आणि जरा त्रास दिला की कसं मस्त वाटत सरकारला!

         आता भाजी, किराणा, दूध, बसभाड़े, कपडे, शूज.....सगळ सगळ वाढेल. किती कमवायच आणि किती खर्चायच?? वर आणि काही बोलायच्या आत - 'आन्तरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाचे भाव वाढल्याने.....' कायमचीच बोम्ब! आन्तरराष्ट्रीय बाजारपेठेत काय चाललय कुणाला कळतय? काहीतरी आपल द्यायच सांगून! कुणी विचारत नाही, विचारल तरी काही उपयोग नाही; सगळ नुसत अन्दाधून्द चाललय. वर आणि मिशन २०२०! २०२० मध्ये आणखी काय काय करतील माहित नाही! गरीबाना तुडवून २०२० साजरा करणार आहेत ****

सरकार चालवन्यासाठी पैसा वापरणार कुणाचा? आमचाच! आणि महागाईची झळ कुणाला? ती पण आम्हालाच!!
वर आणि टॅक्स! परवाच 'आयटी' चा फॉर्म भरुन घेतला आहे. म्हणजे आमच्याच पैशाने 'आमचीच'....! गरीब लोकाना पुर्वी एक वेळेच्या जेवनाची भ्रांत होती, आता पोटाला काहीच खायच नाही! अहो, साधे उदाहरण घ्या- वडापाव - उभ्या- आडव्या महाराष्ट्राचा आधार! ३-४ रु. ला मिळणारा वडापावसुद्धा आज ७-८ रु झाला आहे. केंद्रातल्या त्या 'बाई'च्या हातात सत्ता गेली त्या वेळेलाच आम्ही काय समजायच ते समजलं होतं! आज त्याची अंमलबजावणी होतेय, एवढच! तिने 'ते' बुजगावण (बायली) देशाच्या मुख्य पदावर बसवलंय, आणि तेच्या गोड आवाजात(तोपण बायलीच) ते देशाचा कारभार करतय. त्याचा राज्यकारभार नुसता 'कारभार'च होऊन बसलाय. घर चालवायची अक्कल नसलेल्याला देश चालवायला दिला की अस असतं!

आता या पेट्रोल वाढीचे विविध सूर उमटतील. न्युज चॅनेल्स दोन दिवस बोम्बाबोम्ब करतील, आणि परत 'ये रे माझ्या मागल्या'. झाल! परत आमच्या सारखा 'सामान्य' माणूस उठेल आणि पुन्हा आपआपल्या कामाला. दोन-तीन महिन्यात नवं बजेट येईल. आणखी एकदा ग्रुहोपयोगी वस्तुंचे भाव गगनाला भीडलेले असतील. पुन्हा तेच कट-कट-कट!!

पुन्हा काही वर्षात पुढची लोकसभा-विधानसभा...पुन्हा 'बाई' आपली कमावलेली रक्कम ओतनार, निवडणुकीला ८ दिवस दारू-मटण.....पुन्हा हिचेच सरकार सत्तेवर....पुन्हा पुढच्यावर्षी पेट्रोलवाढ! तुम्ही मरा पण आम्ही मात्र जगणार!!!


राजकीय लाभ तरी आम्हाला काही कामाचा नाही....तसा उद्देशही नाही हे सगळं लिहीण्यामागे. 'आम' आदमी सुखी राहावा, इतकंच वाटतं, म्हणून हा खटाटोप!

विचार करा एकदा सगळ्यांनी 'आमच्या' डोक्यातून.... हीच अपेक्षा!

Tuesday, December 7, 2010

चारोळ्या...

0 comments
वरंधार पावसातसुद्धा,
छोटे थेंब असतात
मोठ्या थेंबाना तेच तर,
'मोठे' बनवत असतात




मधमाश्या असेपर्यंत,
मधाच्या पोळयाला अर्थ आहे
त्यानी घर सोडल्यानंतर,
मध त्यांचे व्यर्थ आहे



आता मी चुकणार नाही,
मला सगळ उमगलं आहे
दावं सोडल्यावर गुरांची,
'काय' होतं ते समजलं आहे



कुणी कुणाला काय म्हणावे,
याचे सुद्धा नियम आहेत
लोकशाही असली तरी,
कायदे मात्र कायम आहेत

Tuesday, November 2, 2010

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

0 comments
दिवाळीचे दिवस! दिवाळी अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे. कुणी कामे संपवून घरी जाण्याच्या नादात आहेत. कुणी खरेदी करण्यात मग्न आहेत. सगळीकडे नुसती गडबड चालू आहे. लहान मुले फटाके उडवण्याची स्वप्ने पाहतायत, स्त्रियांचा साड्या-नवीन कपडे इ.कडे कल आहे. बाजारपेठेत नवनव्या वस्तु दाखल झाल्या आहेत. पणत्या, रांगोळ्या, निरनिराळे आकाशदिवे, सौंदर्य प्रसाधने, खाण्या-पिण्याच्या गोष्टी!

तर ही आहे तुमच्या-आमच्या सारख्या लोकांची दिवाळी! प्रत्येकजण आपल्या कुवतीप्रमाणे दिवाळी साजरी करत असतो; मग त्यासाठी काही करण्याची त्याची तयारी असते. याच्या पलीकडे जाऊन अनेक लोक असे असतात, ज्यांच्या दोन वेळेच्या जेवणाचीसुद्धा भ्रांत असते. त्याना दिवाळी सारखे सण परवडण्याच्या पलीकडे असतात. असे अनेक लोक आपल्या अवती-भवती असतात; आपण त्याना कधी आपुलकीच्या नजरेने पाहतो का? आपण त्याना अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद देऊ शकतो, पण आपल्याला अशा लोकाबद्दल काहीतरी करण्याची ओढ असली पाहिजे.

माझ्यामते, आपण जर आपल्याला त्यांच्या जागी ठेऊन पाहिलं, तर त्यांच्या मनाची आपल्याला जाणीव होईल. या जगात येण्याचा जसा प्रत्येकाला हक्क आहे, तसा हे जीवन इतरांसारखे जगन्याचाही आहे. थोडाफार पैसा आपल्याकडे असला म्हणजे आपण सुखात जगावे आणि अशा गरीब लोकाना त्यांच्या दैवावर सोडून द्यावे हे कितपत योग्य आहे? त्यानाही मने आहेत, अन् त्याना सुद्धा आपल्यासारखे सण साजरे करण्याचा अधिकार आहे. आपण जर त्याना आपल्या आनंदात सामावून घेऊ शकलो, तर किती बरे होईल? आणि मानवतेचा पुरस्कार करत साजरी केलेली दिवाळीच खरी नाही का? विचार करा, आणि निदान एका तरी कुटुंबाला-जे दिवाळी साजरी करु शकत नाहीत, त्याना थोडा हातभार लाऊन त्याना सुद्धा आपल्या आनंदात सामावून घ्या हीच या दिवाळीला तुम्हा सर्वाना विनंती!

ही दिवाळी आपल्या सर्वाना सुखाची-समृद्धीची आणि भरभराटीची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

Saturday, October 16, 2010

0 comments
माझे सर्व मित्र-मैत्रिणी, हितचिंतक, नातलग, ब्लॉग वाचक याना सर्वाना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, October 12, 2010

गड आला पण सिंह गेला!

0 comments
परवा सिंहगडावर जाण्याचा योग आला. पुण्यात राहून इतके दिवस झाले, पण कधी जाता नाही आलं! काही गोष्टी घडूनच याव्या लागतात, हेच खरं! असो!!

सिंहगड- नरवीर तानाजी मालुसरेंचा सिंहगड! ज्या तानाजीने उदयभान राठोडकडून हा गड काबीज केला, तो गड पाहण्याची खूप ईछा होती! पदोपदी महाराज्यांच्या लाडक्या तानाजीच्या हौतात्म्याचं स्मरण उर अभिमानानं भरुन टाकत होतं. महाराजांच्या या अगम्य गडावर घालवलेले काही क्षण.....




























जय महाराष्ट्र!

Thursday, April 8, 2010

पाठ फिरवून पुन्हा....

0 comments
करतो-करतो म्हणून कधी पाठ फिरवायची नसते,
पाठ फिरवून पुन्हा वाट बघायची नसते

प्रत्येकाला वेळ नेहमी साथ देत नसते,
वेळ आल्याशिवाय कधी कुणाची 'बात' बनत नसते
वेळ आली की मात्र, मागे फिरायचे नसते
पाठ फिरवून पुन्हा....

दोन्ही दगडावर पाय ठेऊन चालता येत नसते,
चालताना तोल गेला तरी कळत नसते
स्वत:च्याच नावाने मग, बोंब ठोकायची नसते
पाठ फिरवून पुन्हा....

वाट्याला आलेले कधी सोडायचे नसते
नशीबात नसलेले कधी मागायचे नसते
आपल्याच दु:खाचे, कीर्तन करायचे नसते
पाठ फिरवून पुन्हा....

झालेल्या चूकांतून शिकायचे असते
दुसर्‍याला चुकताना सावरायचे असते
चूक करुन हात वर करायचे नसते,
पाठ फिरवून पुन्हा....

Saturday, April 3, 2010

कधीतरी पुन्हा मला भेटशील का?

2 comments
भुकेल्या दुपारी विचार थांबलेले,
उदास मन झाले तुझ्या आठवणीने
कधीतरी पुन्हा मला भेटशील का?

आसक्ति भावनांची मनात दाटलेली,
फुले तीच आज पथावर सांडलेली
फुलांना विचारून पाहशील का,
कधीतरी पुन्हा मला......

वात हा वेडा घोंघावू लागला,
कधी माझ्या भावनांशी स्पर्धा करु लागला
भावनांशी सरस तो होईल का,
कधीतरी पुन्हा मला......

पहुडलो पिंपळाच्या छायेखाली,
होती आस-रहावं मायेखाली
तुझ्या मायेचा भास इथे होईल का?
कधीतरी पुन्हा मला......

विचारपूस करते नदी जवळील,
एकटा तू आज का, मला सांगशील?
आहे मी निरुत्तरी, उत्तर तू देशील का,
कधीतरी पुन्हा मला......

खिशातील चित्र तुझे काढतो हळूच,
आस मनी फक्त तुला पहाण्याची जणूच
'आस' ही 'भास' नाही, म्हणशील का,
कधीतरी पुन्हा मला......

ढळू लागली दुपार, सांज होऊ लागली,
किरणे ही अपार लोप पावू लागली
किरणांसारखी उद्या पुन्हा येशील का,
कधीतरी पुन्हा मला......

नको जाऊ सोडून मजला, ती म्हणाली आज...

0 comments
अंतरीच्या हृदयाने साद घातली आज,
नको जाऊ सोडून मजला, ती म्हणाली आज...       ||धृ||

मन हे झाले लुळेपांगळे,
तुझ्या नुसत्याच नकाराने
त्याला नवे पंख उडाया, देशील का रे सांग              ||१||


नको कुणाची साथ मजला,
कितीही असेल अर्थ तिजला
या प्रेमाची शपथ सांगते, सोडू नको ही साथ           ||२||


दाखविले मज जग हे जे तू,
कशी जगू त्या-विना बोल तू?
तुझाच होता-तुझाच आहे, आजही मजला ध्यास   ||३||


नव्हतेच यायचे मजकडे जर,
का लाविला लळा हा सुंदर
त्याच-त्या आठवणीने होते, आजही मी बेभान     ||४||


कुणाकडे पाहून जगावे,
स्वत:ला फक्त स्वत:च उरावे
कुणाच्याही शब्दाने न होतो, तुझाच तो आभास    ||५||


कधी जडली सवय कळेना,
कर्णास माझ्या, तुझ्या रवाची
केविलवाणी आज काढते, त्याच रवाचा माग        ||६||


सरता सरेना सांज आज ही,
उगाच राहते मनी आस ही
कधी कोणत्या सांजेला तू, देशील मजला हाक      ||७||

Thursday, March 25, 2010

ग्रीष्मातली ती दुपार....

1 comments
ग्रीष्मातली ती दुपार....
त्या र्नळीवृक्षाची सावली मला आठवते
अन् आठवते ती मोहक पानांची सळसळ,
णू माझ्याचसाठी असलेली...एकेकाळी!

         डोक्याशी भणभणार्‍या त्या अगणित सूर्यकिरणाना
         क्षणात गारवा देणारी,
         अन् माझ्याचसाठी उभी ठाकलेली 'ती' प्रचंड हिरवाई
         आठवते...

माझ्या मनातील तगमगीला शांत करणारी,
आणि देहभान हरपून माझ्यात सामावणारी
ती हिरवाई....आठवते

         उफाळून वाहणार्‍या घर्म ग्रंथीना
         क्षणात सुकवून आधार देणारी,
         अन् मोबदल्यात काहीच न मागणारी
         ती हिरवाई...आठवते
              
दूरवरून फक्त जिच्याकडे आशाळभूतपणाने आलो,
अन् माझ्या आशा पूर्ण करण्याच्या उद्देशाने झालेली
तिची 'फडफड' आवाज करणारी 'धडपड'
आठवते....

         तिच्या गर्द सावलीतून निघताना,
         मला कृतघ्नपने निघून जाताना
         पाहणारी ती...पण काहीच न बोलणारी!
         तसाच मागे न पाहता निघालेलो मी,
         अन् ती प्रचंड तगमग तिच्या मनाला वेढलेली
         आठवते...

त्या वृक्ष-सावित्रिची 'ती' मनमोहक अदा
अन् आज पाहतोय 'ती' भकास अवस्था,
प्रत्येक गळणार्‍या पानामध्ये
साठवलेली माझी आठवण,
अन् मदतीसाठी मला दिलेली आर्त हाक...

         मी आज पुन्हा 'त्याच' सावलीच्या आशेने
         तिच्याकडे आलेला,
         पण आपले दारिद्र्य उघड्यावर पडलेले पाहून,
         माझ्याकडे शांत पाहत उभी असलेली 'ती'
         आठवते....!

Wednesday, March 17, 2010

का थांबली तू अशी आज वेडे...

0 comments
का थांबली तू अशी आज वेडे
पाउल का तुझे हे उगा धडपडावे!


नाही फसविले तू कधी ना कुणाला
कुणाच्या जिवाची तुज सांग चिंता?
ज्याला असे ना पर्वा दु:खाची
का मग तुला ही भीती भेडसावे?


अंतरीच्या सगळया गाठी सोडताना
नव्हता न कसला विचार ठायी,
का मग कुणाच्या हातात हात
देताना तुजला मी न आठवावे?


दिलेली ती वचने अन् बाकी सारे
नसशील का तयांचा कधी विचार केला,
कुठल्या क्षणी मग सांग आज मजला
सुचले स्वप्न तुजला मला सोडण्याचे?

कुणाच्या सुखाचे कुणाला न् नसते
म्हणायचीस मजला कधी कोणे-काळी,
म्हणालोही तुजला नसते असे हे,
परी आज तेच माझ्यावरी ओढवावे?

Monday, February 22, 2010

दाटून कंठ येतो...

5 comments
           ज्या लोकाना ही पोस्ट वाचावी अस वाटल त्याना हे गाण म्हणजे वसंतराव देशपांडेच्या बद्दल मी काहीतरी लिहिणार आहे, अस वाटल असण्याची शक्यता नाकारता येणार नाही! मला या गाण्याविषयीच काहीतरी सांगायचय, पण त्या अनुषंगाने मला त्या गाण्यामागचा गर्भीतार्थ अधोरेखित करायचाय...
           मुलीच्या लग्नावेळी तिच्या वडीलाची झालेली अगतिकता शब्दात व्यक्त करण्यासाठी या गाण्यापेक्षा कुठलेही गाणे सरस ठरू शकनार नाही, अस मला वाटत. आपल्याकडे, मुलगी ज्यावेळी जन्माला येते, त्यावेळी ती दुसर्‍याच घरची म्हणून येते!  नंतर तिच शिक्षण वै. पूर्ण झाल नि ती संसार करन्यासाठी योग्य झाली की तिच्या वडिलाना चाहूल लागते, ती तिच्या लग्नाची. हातात वाढलेली पोर दुसर्‍या घरी सोडून जाणार, नि तीही कायमची, या विचाराने बापाच मन व्याकुळ होऊन जात; पण कर्तव्य हे करावच लागत.
          तिला घर चांगल मिळेल का, नवरा चांगला मिळेल का, मिळकत चांगली असेल का, आपली मुलगी सगळ व्यवस्थित निभावेल का, असे एक ना अनेक प्रश्न बापाला सतावू लागतात. नंतर अनेकविध स्थळे पाहून झाली की सुयोग्य मुलगा ठरतो, नि बघता-बघता घराच लग्नघर होऊन जात. पाहुण्यांची गडबड, घरोघरी द्यावयाची आमंत्रणे, सगळी घाई चालू होते..पण मुलीच्या बापाच्या मनाला काही उसंत नसते! सगळ काही व्यवस्थित पार पडेल ना, कुठे कमी राहणार नाही ना, पाहुण्यांचा मान-पान नीट होईल ना, आपण केलेल सगळ नवरा मुलगा गोड मानून घेईल ना यासारख्या प्रश्नांची वरचेवर मनात भाउगर्दी होत असते. शेवटी 'लग्न पहाव करुन' अस उगिच म्हटल आहे?
         सगळ काही जुळून येत नि लग्नाचा दिवस उजाडतो; ठरलेल्या वेळी अक्षता पडतात, नि मागे एखाद्या कोपर्‍यात उभ राहून मुलीचे वडील अतिशय जड अंत:करनाणे मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकतात. एकीकडे कर्तव्य पार पाडल्याचा आनंद तर दुसरीकडे बाप-लेकीच्या होणार्‍या ताटातूटीच दु:ख!
         नंतरची वेळ प्रत्यक्ष ताटातूटीची...मुलगीला नेहमीचे समजूतदारपनाचे चार शब्द सांगून बाप निरोप घेतो, माघारी फिरतो नि...काय असेल त्या मुलीच्या बापाची त्यावेळी स्थिती? आणखी इथेच हे गाण सर्व काही सांगून जात......मुलीचा बाप म्हणतो,


'घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे
हा देह दूर जाता, मन राहणार मागे
धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे
परक्या परी आता मी, येथे फिरुनी येणे....'


           ईतक काही करुन शेवटी परकेपणा घेऊन एक प्रेमळ बापच मागे फिरू शकतो; या जगातील तमाम मुलीना मला फक्त ईतकच सांगावस वाटत, की आई-वडीलांच्या या त्यागाला त्यानी आयुष्यभर लक्षात ठेऊन संसार करावा.
           आजच्या पिढीच्या अनेकानी जर वरील नमूद केलेल गीत ऐकलेल नसेल, तर त्यानी ते जरूर ऐकाव...






जय महाराष्ट्र!

Saturday, January 16, 2010

आपली संस्कृती आणि आजची पिढी...

11 comments
विषय थोडा क्लिष्ट आहे; अनेकाना न रूजनारा! न्हणूनच, पहील्यांदाच स्पष्ट करत आहे की, कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. प्रत्येकाच मत विभिन्न असु शकत या विषयवरती!
तर या विषयाला हात घालण्याचं कारण म्हणजे, अगदी परवा परवाच एक गोष्ट घडली; मी आणि माझे सहकारी असे दोघेजण मिळून चहा घेण्यासाठी म्हणून एका चहाच्या टपरीवर गेलो. दोघानि चहा घेतला, पैसे देऊन मागे वळलो; समोर एक तिशीच्या आसपासची तरुणी उभी! चेहरयाच्या ठेवणीवरुन आणि परिवेशावरुन तरी चागल्या मराठी घरातील वाटत होती. वाटत होती कसली, होतीच मराठी! ती मराठीतून आपल्या सहकारी मित्राशी बोलत होती! एका हातात एक भलं मोठ सिगरेटच पाकीट आणि दुसर्‍या हातात एक अर्धवट जळालेली सिगरेट घेऊन बिनधास्तपणे कपनीच्या कटयावर बसली होती. मला आधी २-३ मिनीटे काही सुचेना, पण लगेच स्वतःला सावरलं. अशा गोष्टी नित्यनियमाच्या झाल्याने, कुणालाही त्याचं फारसं वाटेनासं झालंय हेच खरं! समोरून २-३ कामकरी बायका कामावरुन घरी निघाल्या होत्या. त्यातील एक स्त्री म्हणाली, "अगा बया, ही बया बघा बापयावानी सिगरेट ओढायल्यानी!" आम्ही(मी आणि माझे सहकारी) एकमेकांकडे पाहून हसलो आणि निघालो पुन्हा कामावर!!
आजच्या धकाधकीच्या जीवनात पैशाच्या मागे धावताना आपण पाश्छिमात्यांच इतकं अनुकरण करु लागलो की, ते आज आपल्याच मानगूटीवर बसू पाहत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या आल्या, त्याबरोबर त्यांची विचारसरणीही घेऊन आल्या; आज आपल्याला गुढीपाडव्यादिवशी घरी गोडधोड खाण्यापेक्षाही ३१ डिसेंबरला नंगानाच करत नव्या वर्षाचं स्वागत करण्यात धन्यता वाटते. पण याचेही स्त्रोत आपणच आहोत, हेही तितकच खरंय! कारण स्पर्धेच्या नावाखाली आपण आपल्या मुलाबाळांचे इतके लाड केले की, आपल्या मनाविरुध होणारी एकही गोष्ट पचविण्याची हिम्मत त्यांच्य़ामध्ये उरली नाही. याला त्यांचा निरागसपणा म्हणावं की आपल्याच लाडाने आलेला माज? संस्कृती-रक्षण वैगैरे खूप लांबच्या गोष्टी झाल्या, पण संस्कृती म्हणजे काय हेच या मुलांना उमगलेलं नाहीए, ही आपल्याच लाडाने केलेली आपल्याच संस्कृतीची हत्या नव्हे काय?
पूर्वीचा काळ म्हणजे अगदी स्त्रिया डोक्यावर पदर घेऊन वावरायच्या तसा इथे अभिप्रेत नाहीये, पण मूलं-बाळं तान्ही असताना जर त्यांच्यासमोर वर नमूद केलेल्या स्त्री सारखे आदर्श असतील, तर ती पुढे ज़ाऊन राष्ट्राचं भविष्य काय उज्ज्वल करणार? आजही एकीकडे दिवेलागणीची वेळ झाल्यावर देवघरात दिवा लावणारी स्त्री आपल्याच देशातली; नि दुसरीकडे रात्री १२-१२ पर्यन्त घराबाहेर रहणारी स्त्री सुदधा आपल्याच देशातली!! कामाचं स्वरुप बदललं, तशा कामाच्या वेळाही बदलत गेल्या; मान्य! पण आपली ममत्वाची नैसर्गिक भावनाच विसरून जर स्त्रिया असं वागू लागल्या, तर त्यांच्या घरच्यांनी मानसिक आधार शोधायचा कुणाकडे?
वेळेच्या बंधनाचाही तसा तितकासा उहापोह नाहीये; पण बाहेरून आलेल्या नीतीमत्तेचा किती प्रमाणात अंगिकार करायचा, हे तरी किमान आपल्या हातात आहे! बाहेरील, विशेषतः पाश्चिमात्य देशात अशा गोष्टीना कायदेशीर मान्यता आहे, कारण ती त्यांची संस्कृती आहे. त्या लोकाना आपल्याला मिळणार्‍या मोबदल्यापेक्षाही आपल्या संस्कृतीवरचं प्रेम लाखमोलाचं आहे. मग ते आपल्याला का असू नये? कुठचाही हौलीवूडपट बघा, पूर्ण चित्रपटात किमान एकदातरी तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रध्वज दिसेल. भिंतीवर, टेबलावर, कपड्यावर, मोटारींवर जिकडे-तिकडे फक्‍त राष्ट्रध्वज दिसेल! इतक्या छोट्या-छोट्या गोष्टीवरुन त्यांचा राष्ट्रभिमान जागा होत असेल, तर खरोखरंच ते महासत्ता म्हणून मिरवण्याच्या लायकीचे आहेत! संस्कृतीप्रेम हेच त्यांच्या यशाच गमक नव्हे काय?
आपणसुधा २०२० सालापर्यन्त महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत आहोत. मग त्या दृष्टीने वाटचाल करण्याऐवजी आपण कधीपर्यन्त ईतरांच अनुकरण करत बसणार आहोत? आपण जे इतरांच्या जीवावर नाचत आहोत, ते आउटसोर्सीगच जर बंद झाल तर काय माती खायची इथल्या युवकानी? देशाला महासत्ता बनविण्यासाठी आवशकता असते ती काहीतरी करून दाखवण्याची ईछा असणार्‍या भारलेल्या मनांची!! आणखी हे ध्येय साध्य करण्यासाठीचं बळ जर आपली संस्कृती देत असेल तर का म्हणून तिच्या अब्रूची लक्त् र अशी वेशीवर टांगायची? त्या स्त्री बद्दल इतकी तेढ वाटण्याचं कारण म्हणजे, ती मराठी विवाहिता होती. ग्रामीण भागात अजुनसुधा पोटाला चटका देऊन मराठी घरात तेलाची वात लावली जात असताना, पैसा जास्त झालेने अशी स्वतःच्याच आयुच्याची आणि पर्यांयाने संस्कृतीची वाताहत करून घेणे कितपत योग्य आहे?