भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले

- सुरेश भट

Wednesday, January 26, 2011

काहीतरी करायला पाहिजे...

3 comments

     आज संध्याकाळची गोष्ट! मी ऑफिसला निघालो होतो. डांगे चौकात सिग्नल लागला म्हणून थांबलो. लगेच माझ्या पुढेच उभा असलेला एक ट्रॅफिकवाला माझ्याकडे आला. त्याच त्याच कायमच्या गोष्टी..लायसन्स आहे काय, गाडीची कागदपत्रं वै.वै.

मला म्हणाला, "PUC?"..मी म्हटलं "नाही!". लगेच "साईडला ये" म्हणाला. मी गेलो.

मग नेहमीचं Negotiation चालू झालं..पहिल्यांदा १०००, नंतर ५००, नंतर ३००...

शेवटी मला म्हणाला, "तू किती देऊ शकतोस?"

मी म्हटलं "५०"! त्याला असा राग आला की, जसा काही मला मारुनच टाकणार होता.

मला म्हणाला, "मग ठीक आहे...PUC नसताना १००० रु दंड भरावा लागतो..तो भर आणि लायसन्स घेऊन जा".

मी म्हटलं, "ठीक आहे. माझी बाइक पण घेऊन जा." मी ठरवलं होतं, की ऑफीसला आज मस्त दांडी मारायची पण याची वाटच लावायची.

मग पुन्हा आला...मला म्हणाला, "देऊन टाक आहेत तेवढे!" बहुतेक माझी पण वेळ आज वाईट होती...बरोब्बर पाकीट उघडलं आणि १०० ची नोट बाहेर दिसली. मग तो जरा जास्तच नाटक करू लागला. तोपर्यंत ऑफिस मधून बॉसचा फोन! मी विचार केला पुन्हा कधीतरी याला बघू...शेवटी आपली सुद्धा चुक आहेच. फक्त आळसापोटी PUC नव्हतं काढलं, आणि शिक्षा भोगावी लागली. पहिल्यांदा जाउन PUC घेतलं! असो.

तर या निमित्तानं सांगायचं हे आहे की, पार्ट्या करून २००० गेलेलं काही वाटत नाही हो; पण या हरामखोराना फुकटचे १०० जरी दिले की फार वाईट वाटतं. कदाचित माझ्यासारखीच अनेक लोकांची हाय लागत असेल साल्याना.

माझ्याकडे होते पैसे म्हणून दिले, ज्याच्याकडे नाहीत त्यानं काय करायचं? कायदे पाळले पाहिजेत, पण या भ्रष्ट लोकाना कळणार कधी आणि कसं? हा ईतिहास आहे की जर तुम्ही System बदलायला गेलात तर System च तुम्हाला बदलून टाकते. पण शेवटी नालायक System च्या विरोधात गेलो नाहीत, तर उद्या आम्ही 'आम्ही' राहू शकणार नाही; मी आता ठरवलंय या आणि अशा अनेक गोष्टीना वाचा फोडायची. ते सुद्धा अगदी कायद्यात राहून!! आणि शेवटी नाहीच जमलं तर आहेच की आपला 'आखरी रास्ता'! आणि आम्हाला जवळून ओळखणार्‍याना माहीतच आहे, की तो 'आखरी रास्ता' काय आहे ते! लिखाणाच्या माध्यमातून सुद्धा माझा पुढील काही दिवस याच विषयावर भर राहील. बघुया आम्हाला बदलता येता की नाही ते System ला. शेवटी साथ तुमच्या सारख्या हितचिंतकांची हवी आहेच!! भेटू लवकरच........

Tuesday, January 11, 2011

बेरोजगारांची "आईटी"!

2 comments
         परवाच एक मित्र भेटला. काही दिवसापूर्वी मला त्याने त्याचा Resume Forward केला होता. मी काही करू शकलो नाही त्याच्यासाठी, पण असच बोलणं सुरू होता आमचं या विषयावरती. 'किती दिवस बसून राहायचं असं', हा ओघ त्याच्या बोलण्यातून मला जाणवला होता. मी असाच विषय-परिवर्तन करण्यासाठी काही इतर विषय काढले, पण शेवटी काही त्याच्या बोलण्यातून 'जॉब'चा विषय जाईना! मग मी सुद्धा त्याच विषयावरती बोलू लागलो.
      
         IT Sector मध्ये काम करायला लागून मला चार वर्षे झाली, आणि IT तील Recruitment सुद्धा मी जवळून पाहिलेलं आहे, पाहत आहे. आपल्याकडे (India) Software मध्ये नोकर्‍यांची इतकी वानवा का निर्माण झाली? त्याला सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपल्या पालकांची मानसिकता! आपल्या देशात लोकाना एक सवय आहे; कुणीतरी काही तरी केलं आणि त्यामध्ये यशस्वी झालं रे झालं, की लगेच आपापल्या पाल्याना तोच अभ्यासक्रम करण्यासाठी 'भाग पाडायचे'!  मी 'भाग पाडायचे' एवढ्यासाठी म्हटलं कारण आपल्या इथे जास्तीत जास्त (सगळे नव्हे) पालक आपल्या पाल्यावर अभ्यासक्रम 'लादत'च असतात. मग नाइलाजास्तव मुलं कशीबशी तो पूर्ण करतात आणि जॉब करायला बाहेर पडतात.

         चार-पाच वर्षांपूर्वी IT मध्ये अशी काही बूम आली, की उठला-सुठला ITच च. शिक्षण घेऊ लागला. मग कॉलेजेसची डोनेशन्स सुद्धा वाढली. खास आईटी साठी कोटा वाढु लागला. आणि इथेच माशी शिंकली.  जो तो आईटी साठी मरू लागला. ईर्षाच चालू झाली आईटीत कामे करण्याची! ईतकेच नव्हे, तर मूलीना स्थळे पाहतनासुद्धा पालक आईटीतील मुलाचाच हट्ट धरू लागले. याचंच रुपांतर भल्या मोठ्या बेरोजगारीत झालेलं आपल्याला आज दिसतय.

         आज आईटीत काम करण्यासाठी लागणार्‍या eligibility criteria मध्ये समाविष्ट केलेले अभ्यासक्रम असे आहेत... BE(Computer Science & IT), Diploma(CS & IT), BCA,BCS,MCA,MCS,BSc(Comp),MSc(Comp),MBA(IT)! आणखी हे सर्व सोडून तुम्ही कोणत्याही शाखेचे इंजिनियर असाल (e.g. BE(Electronics/Mechnical)), CDAC सारखे कोर्स करा आणि घुसा आईटीत! या सर्व गोष्टीमुळे इतके लोक बाहेर पडले, की सर्वांच्या नोकरी विषयक गरजा पूर्ण करणं आईटीतील कंपन्याना अवघड होऊन बसलं! आणि दरवर्षी या सर्व Streams मधून बाहेर पडणारी मुले बेरोजगार झाली. आता मुलाना इतके पैसे खर्चून शिकवल्यानंतर पालकांच्याही त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा असणारच. त्यामुळे या बेरोजगार मुलाना आणखी टेन्शन येऊ लागतं. आणि ती खचून जातात. उमेदीच्या काळात खचून जान्याने त्यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम होतात. आणि हे सगळं का व्हावं तर त्यानी न केलेल्या चुकीबद्दल? ही भावना खूप वाईट आहे.

         मी अशा अनेक मुला-मूलीना खूप जवळून पाहिलं आहे. आता या मुलाना फ्रस्ट्रेशन येण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे त्याना इतर जागी (आईटी सोडून) काम करण्यास येणार्‍या अडचणी! आईटीत काम करू शकत नसल्याने मग अशी मुले-मुली BPO,Call Centers कडे वळतात. पण हे क्षेत्र सुद्धा या मुलाना जवळ करत नाही. कारण त्यांच्या मते, आईटीतली मुलं आईटी बूम मध्ये आल्या-आल्या तिकडे वळतात, तिथला जॉब सोडून! मग आईटीतल्या मुलानी करायचं काय? या सगळ्याला सामोरं गेल्यानंतर त्याना असं वाटू लागतं, की आपल्याला काहीच करता येत नसेल का? आणि नेमकी हीच भावना खूप मारक आहे. खरं तर सरकारने यासाठी काहीतरी पाऊल उचलायला हवं होतं, पण त्याना कुठे वेळ आहे हे सगळं बघत बसायला? आपल्याला माहीतच आहे आपलं सरकार!! तर, मला वाटतं यासाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे. आईटी च्या भूलभुलैय्या ला बळी न पडता, आपण व्यवसायाभिमुख शिक्षणाकडे वळालं पाहिजे. जेणेकरून, पुढची पिढी तरी वाया जाणार नाही. आईटीचे शिक्षण पूर्ण झालेल्यानी आणि जॉब नसणार्‍यानी सुद्धा खचून जाऊ नये. डोकं शांत ठेऊन येणार्‍या परिस्थितीला सामोरे जाण्याचं धाडस ठेवावं!

 
     ठेवलंय काय त्या आईटी मध्ये...डेडलाईन जवळ आली की काम, वीकेंड्स ला काम, दिवसा काम, रात्री काम, मध्यरात्री सुद्धा काम! आणि मिळणारा मोबदला फक्त ईतराना दाखवण्या पुरता की मी ऐटीत(Sorry आईटी) आहे!!