भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले

- सुरेश भट

Tuesday, December 7, 2010

चारोळ्या...

वरंधार पावसातसुद्धा,
छोटे थेंब असतात
मोठ्या थेंबाना तेच तर,
'मोठे' बनवत असतात




मधमाश्या असेपर्यंत,
मधाच्या पोळयाला अर्थ आहे
त्यानी घर सोडल्यानंतर,
मध त्यांचे व्यर्थ आहे



आता मी चुकणार नाही,
मला सगळ उमगलं आहे
दावं सोडल्यावर गुरांची,
'काय' होतं ते समजलं आहे



कुणी कुणाला काय म्हणावे,
याचे सुद्धा नियम आहेत
लोकशाही असली तरी,
कायदे मात्र कायम आहेत

0 comments: